२४ वय संपत आलंय. दोन वर्षे झाले परीक्षा देऊन तरी , अजून मुलाखत नाही.
#स्वप्नील च्या पत्रातलं त्याचे हे वाक्य.
बातमी आली , बातमी फिरली. दोन चार लोकं बोलले. काहीजण फक्त पाहत राहिले. आणि बाकी अवघे #राज्य आणि हा देश मूग गिळून गप्प बसला. कारण जीव गमावलेला त्यांचा कुणी नव्हता. तो आयुष्याच्या रेस मध्ये धावणारा इतरांप्रमाणे एक #स्ट्रगलर होता. मुलाखत झाल्यावर , चांगल्या विभागात नोकरी लागेल. आणि मग घरचं सारं कर्ज कमी करता येईल. या विचाराने कितीदा त्याचं मन खाल्लं असेल. पण स्वप्नील ने घेतलेला हा #निर्णय चुकीचा होता. पर्याय आहेत , पर्याय उभे राहतात. स्वप्नील तुझ्या आई वडिलांना आता कोण पाहणार...? #बहिणीचे काय होणार....?
हे मुर्दाड सरकार आणि चाटु मीडिया तूझ्या जाण्याचं फक्त #मार्केटिंग करू शकतात. कारण #संवेदना यांना नाहीत.
यांच्या आणि लोकशाहीतल्या प्रत्येकाच्या संवेदना फक्त एका #राजकारण्याचा पाळीव श्वान गेल्यावर आणि एका मोठ्या अभिनेत्याचा त्याच्या दुसऱ्या पत्नीसोबत , #पंधरा वर्षांनी #घटस्फोट झाल्यावर जाग्या होतात...
बाकी तू , आणि मी #पाताल_लोक मधले किडे आहोत...
जे रोज , आईत खाऊंच्या पायाखाली येऊन चिरडले , भरडले जातो.
राज्य सरकारने भरती प्रक्रियेसंदर्भात योग्य वेळी निर्णय घेतले असते तर विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना तिलांजली
लागणार नाही..😢
#स्वप्नील_लोणकर
आता तरी राज्य सरकारची डोळे उघडतील का..?
लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्यासोबत खेळण्याचा कोणताच नैतिक अधिकार नाहीये.. माय बाप सरकार लवकर भरती प्रक्रिया सुरू करा..
#स्वप्नील_लोणकर
तू इथल्या कुजक्या आणि सडक्या व्यवस्थेचा बळी गेला..!
गेंड्याची कातडी असलेली नेते आपल्या पोराचं राजकीय पुनर्वसन त्वरित करतील पण तुझा हक्क हिराऊन तुला मारतील..!
#स्वप्नील_लोणकर 😢😢
अधिकारी होण्याचं स्वप्न उराशी बाळगलेल्या स्वप्निलने सुसाईड नोटच्या सुरुवातीलाच MPSC मायाजाल आहे,असं लिहून आत्महत्या केली..हे किती मोठा दुर्दैव म्हणावे
स्वप्नील लोणकर याने 27 वेळा रक्तदान आणि प्लेटलेट दान केले होते.. 100 जीव वाचवायचे होते 72 राहिले..असे सुसाईड नोट मध्ये लिहिलंय.. असा अस्सल अधिकारी दर्जाचा मुलगा सोडून जाणे हे महाराष्ट्राचे दुर्दैव.
भावपूर्ण श्रद्धांजली मित्रा..एवढे टोकाचे पाऊल नव्हते उचललायला पाहिजे होते...
Post a Comment